लातूर शहरातील एका ईमारतीचे पडणे आणि माझ्या पत्रकारीतेची सुरूवात या दोन भिन्न गोष्टी एकदाच झाल्या. ती ईमारत पडल्यानेच मला पत्रकार होण्याची संधी मिळाली. १९९३ ९४ चा काळ, त्यावेळी प्रकाश पाठक मन्वंतर नावाचे पाक्षिक चालवत होते आणि मी अकरावीच्या वर्गात होतो. पाठकांनी नगर पालीकेच्या विरोधात भुमिका घेतली होती. त नगर पालीकेतील कामावर आपल्या पाक्षिकातून चांगलीच टिका करत याचा राग त्यावेळेसचे नगराध्यक्ष मधुकर कोकाटे यांच्या मनात होताच. नियमावर बोट ठेवत कोकाटे यांना मन्वंतरचे कार्यालय पाडले. माझे आत्याचे मिस्टर दत्ता जोशी यांना छायाचित्र काढण्यावरून मापहाणदेखील झाली. त्यानंतर प्रकाश पाठकांनी विलासराव देशमुखांच्या विरोधात लढा उभारला. आणि या वेगळ्याच लिखाण शैली मुळे मी चांगलाच पर्भावित झालो. याच काळात मन्वतर ने डंकेल प्रस्तावावर विऱोध करणारा अंक काढला होता. यात आपला लेख देण्यासाठी मी मन्वंतरच्या तात्पुरत्या कार्यालयात गेलो. आणि तिथेच मला माझ्या पत्रकारीतेचे गुरू भेटले त्यांची भेटच माझ्या पत्रकारीतेची सुरूवात करणारी ठरली.
प्रदीप ननंदकर लातुरातील एक नेमस्त आणि विचारनिष्ठ पत्रकार. त्यांना मी काका म्हणतो. त्याच्या कामावर बोट दाखविण्याची हिंम्मत अजुन कोणात झाली नाही. पुढेही असे होणे नाही. ईतके स्वच्छ काम आहे. वैचारिक स्पष्टता आणि व्यवहारीक पारदर्शकता हे त्यांचे काही खास गुण सोबतच्या माणसाला कामकरायला मोकळा वाव देणं आणि त्यांच्याकडून चांगले काम करूम घेणे ही काकांचा खासीयत. बातमीत आपला हेतू स्वछ्छ असावा हे काकानींच मला शिकवले आणि त्यांनी आयुष्यभर पाळले, कोठे चुकतोय असे वाटल्यावर ते बिनदिक्कत सांगायला चुकले नाहीत. एक तर चुक करू नये आणि घडलीच तर ती न लाजता स्वीकारावी हे काकांनीच मला शिकवले. माझ्या पत्रकारीतेचे गमभण त्यानीच गीरवून घेतले. आणि मी आज जो काही आहे ते खेवळ त्यांच्यामुळे हे मी अभिमानाने सांगतो.
माझ्यात काही दोष असतील तर ते माझे आहेत आणि काही चांगले असेल तर ते प्रदीप काकांचे आहे. १९९१४ ते २००२ हा नऊ वर्षाचा काळ मला त्यांच्यासोबत घालता आला. आणि मला याच काळात पत्रकारीता समजली. रेणापूरचा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, लातुर मध्ये काकांना वेळोवेळी मदत, सोलापूरला उपसंपादक अशी विविध स्वरूपातील कामे करता आली.
आजही मोबाईलवर फोन केला की बोल रे.. हा आवाज मनाला आश्वस्त करतो. आणि खरं सांगू ते माझ्यासाठी सेन्सॉर बोर्ड पण आहेत. मी या गुरू पोर्णीमेला एकच भिवचन देतो की माझ्या हातून जाणीवपूर्वक चुक होणार नाही. आणि पत्रकारीतेचा गैरवापर होणार नाही काका तुमचा हा शिष्य चुकला तरी ते प्रामाणिकपणे कबुल करेल त्यासाठी शिक्षा भोगावी लागली तरी हरकत नाही. काकांसारखा गुरू मिळायला भाग्य लागते.
या ओठांना छुंबू घएईन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलुन घ्यावी ईथल्या जगण्यासाठी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा